
राज्यातील मतदार यादीत तब्बल *१६ लाख बोगस मतदार घुसवले गेले आहेत, असा *गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते म्हणाले, “निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू.”
राज ठाकरे म्हणाले, “निवडणुकीत पारदर्शकता असावी ही लोकशाहीची मूलभूत अट आहे. परंतु मतदार यादीतून योग्य ती पडताळणी न करता नव्या नावांची भर घालणे आणि मृत किंवा स्थलांतरित नागरिकांची नावे ठेवणे, ही गंभीर बाब आहे.”
ते पुढे म्हणाले, “या बोगस मतांच्या आधारे निवडणुकांचे निकाल प्रभावित होऊ शकतात. म्हणूनच आम्ही निवडणूक आयोगाकडे याची सखोल चौकशी करण्याची मागणी करतो.”


